लाडकी बहीण योजना अडकली कुठे? KYC नंतरही लाभ न मिळालेल्यांसाठी महत्त्वाचा उपाय

ई-केवायसी अनिवार्य; अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५
योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शासनाने ई-केवायसी करणे बंधनकारक केले आहे. यासाठी ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. शासनाच्या निर्देशानुसार ई-केवायसी पूर्ण नसलेल्या अर्जांना लाभ देण्यात येणार नाही.
ई-केवायसी प्रक्रियेत नेमक्या कोणत्या अडचणी येत आहेत?
ई-केवायसी दरम्यान अनेक महिलांना तांत्रिक तसेच माहितीशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागत आहे. काही प्रकरणांमध्ये ई-केवायसी करताना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे चुकीची भरली गेल्यामुळे अर्ज प्रलंबित राहिले आहेत. आधारकार्ड आणि बँक खाते लिंक नसणे, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक बदललेला असणे, तसेच OTP न मिळणे यामुळेही केवायसी प्रक्रिया अर्धवट राहते.
केवायसी दुरुस्तीचा पर्याय सध्या उपलब्ध नाही
महत्त्वाची बाब म्हणजे, सध्या ई-केवायसीमध्ये झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी कोणताही स्वतंत्र पर्याय किंवा लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. त्यामुळे चुकीची माहिती भरलेल्या अनेक महिलांना अडचणीत सापडावे लागत आहे. शासन स्तरावर दुरुस्तीची सुविधा सुरू करण्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
लाभ न मिळालेल्या महिलांनी काय काळजी घ्यावी?
सध्या केवायसी दुरुस्तीचा पर्याय उपलब्ध नसला तरी महिलांनी काही मूलभूत गोष्टी तपासणे गरजेचे आहे. आधार-बँक लिंकिंग, बँक खाते सक्रिय असणे, DBT सुविधा सुरू असणे आणि मोबाइल क्रमांक अद्ययावत असणे
लवकरच अधिकृत माहिती देणार
शासनाकडून ई-केवायसी दुरुस्ती, पुनर्तपासणी किंवा नव्याने पडताळणी प्रक्रिया सुरू करण्याबाबत लवकरच अधिकृत माहिती येण्याची शक्यता आहे. त्या संदर्भातील सविस्तर अपडेट आम्ही तुम्हाला त्वरित देणार आहोत, असे संबंधित विभागांकडून सूचित करण्यात आले आहे.


